तापाची लक्षणे आणि उपाय व कारणे: ताप म्हणजे काय?
Table of Contents
Toggleताप आलाय ? 'ही' पथ्ये नक्की पाळा
सध्या पाऊस चांगलाच जोरात आहे आणि निरनिराळ्या तापांच्या साथीही तितक्याच वेगाने पसरताहेत. ताप हा आजार नसून आजाराचे एक लक्षण असते. तापाचे कारण कुठलाही आजार असू शकतो. अनेकांना असे वाटते की ताप आला म्हणजे साधा फ्लू असेल आणि दोन-तीन दिवसांत आपोपाप बरा होईल. पण सध्या मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, युरिन इन्फेक्शन, कावीळ असे एक प्रकारे वैद्यकीय औषधोपचाराने यच्या होणाऱ्या पण काहीशा गंभीर आजारांच्या अनेक केसेससुध्दा दिसून येतात. साहजिकच ताप आल्यावर दोन-तीन दिवसांनी बघू, असे म्हणून डॉक्टरांकडे उपचाराला जायला दिरंगाई करण्याचे टाळावे.कुठलाही ताप असला, तरी तापाच्या दरम्यान, रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे घेण्याबरोबर स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात काही पथ्ये सांभाळणे आवश्यक असते. ही पध्ये सर्व प्रकारच्या तापांना लागू पडतात. ती काटेकोरपणे सांभाळल्यास डॉक्टरांच्या औषधांनी रुग्णांना लवकर बरे वाटते.
पूर्ण विश्रांती कुठलाही ताप आल्यास कामातून, शाळा-कॉलेजातून रजा घेऊन पूर्ण विश्रांती घ्यावी विश्रांती न घेतल्यास तुमचा आजार जास्त काळ रेंगाळेल पलूसारख्या आजारात कामाला किंवा शाळा-कॉलेजात गेल्यास, इतरांना तो होण्याची शक्यता असते
आंघोळ ताप असला तरी गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. आंघोळीमुळे ताप वाढत नाही, उलट आंघोळीनंतर घाम येऊन ताप उतरू शकतो. शिवाय घामेजलेल्या शरीराची दुर्गंधी जाऊन ‘फ्रेश’ वाटते.
अग्रहार कुठल्याही तापात तोंडाला चव नसते. त्यामुळे अंत्रावर बासना नसते. साहजिकच तापात रुग्ण अन्न घ्यायला टाळाटाळ करतात. त्यामुळे तापाने आलेला अशक्तपण्या जास्त चाढतो. शिवाय पोटात दुखणे, उलट्या होणे, गरगरणे, मळमळणे, चक्कर येणे असे त्रास उद्भवतात, तापात वरण-भात, खीर, दूध-पोहे असा हलका आहार घेतल्यास अशक्तपणा कमी जाणवतो
त्यामुळे ताप आला तरी खाणे टाळू नये. अन्न खाणे गरजेचे, नुसत्ते फळांचे रस घेतल्यास अशक्तपणा कमी होत नाही. पाणी तापामुळे शरीरातील पाणी कमी होत जाते. साहजिकच नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यावे, अन्यथा कमालीचा थकवा, चक्कर येण्याचे प्रास वाढू शकतात.
डीहायड्रेशन, लघवीचे प्रमाण कमी होणे, मूत्रपिंडांवर ताण येणे असे गंभीर विकार होतात. पाण्याप्रमाणेच ताज्या फळांचे रस, सरबते, शहाळी घ्यावीत. मात्र थंड पाणी, शीतपेये टाळावीत. कपडे तापामध्ये सैल आणि सुती कपडे घालावेत. ते दिवसातून दोनदा किंवा किमान रोजच्या रोज बदलावेत.
घट्ट आणि सिंथेटिक कपडयांमुळे अस्वस्थता वाढते. इतर गोष्टी सदर्दी-खोकल्याच्या आजारात गरम पाण्याच्या गुळण्या करणे, लहान मुलांना ताप असताना दिवसातून दोनतीनदा स्पंजिंग करणे, थंडी वाजत असल्यास गरम कपडे वापरणे या गोष्टी कराव्यात.
ताप : 'हे' उपाय करा
पावसाचा जोर राज्यभरात वाढला आहे. या पावसामुळे वातावरणात बदल होऊन सर्दी, खोकला आणि त्यानंतर ताप येतो. कोणत्याही ऋतूमध्ये आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच तापाचा त्रास जाणवतो. अशावेळी डॉक्टरांकडे जाणे हा उपाय तर असतोच पण त्याचवेळी काही घरगुती उपाय करून पाहिल्यास शरीराचे वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते. पाहुयात काय आहेत हे घरगुती उपाय….
ताप आल्यावर काय करावे घरगुती उपाय
- पुदिना आणि आल्याचा काटा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेधी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
- तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उत्तरतो.
- थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उत्तरतो.
- जर सर्दी, ताप, मंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुकडा लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.
- बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून घेतल्याने त्याचा ताप उतरण्यासाठी उपयोग होतो.
- तापात मनुके खाणे उपयुक्त असते. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत, ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे.
- आहारात सफरचंद, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थ्यांचा समावेश करावा.
- कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५ ते १० मिनिटे चांगले उकळू द्या. मिनिटे उकळू द्या. त गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.
- तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं. वासोचत संत्र्यांचा रस घेतल्यानेही तापावर आराम मिळतो.

लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे
लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. परंतु अंगाला हात लावून जाणवत जरी असला तरी प्रत्यक्षपणे थर्मामीटरवर मोजणे गरजेचे आहे. हल्ली तर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरवर प्रत्यक्षात ताप अंकामध्ये दिसत असल्याने ताप मोजणे सोपे झाले आहे आहे. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गाष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. जेणेकरून डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते.
ताप अश एकन्या खाली उतरवा. काखेत ताप मोजण्यापूर्वी तो भाग घामविरहित पुसून ठेवा. बऱ्याचदा तापामध्ये विश्रांती पुरेशी असते. जर बाळ तापात पण हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही, अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला पैरासिटामॉल देण्यास हरकत नाही. तापात वाळ मलूल असेल, उलटी करत असेल, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ताप गंभीर आजारामुळे असू शकतो.
ताप मोजण्यापूर्वी थर्मामीटरचा पारा ९८ ता अश एकन्या खाली उतरवा. काखेत ताप मोजण्यापूर्वी तो भाग घामविरहित पुसून ठेवा. बऱ्याचदा तापामध्ये विश्रांती पुरेशी असते. जर बाळ तापात पण हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही, अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला पैरासिटामॉल देण्यास हरकत नाही. तापात वाळ मलूल असेल, उलटी करत असेल, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ताप गंभीर आजारामुळे असू शकतो.

ताप आल्यावर हे करू नका
हे करू नका: बाळाला स्वेटर, चादर, रममध्ये गुंडाळू नये. नळाखाली थंड पाण्याचे आंघोळ घालू नये. बर्फ घातलेल्या पाण्याने अंग पुसू नका. बाळाला ताप कमी होण्यासाठी पैरासिटामॉल हेच औषध तापामध्ये देणे योग्य आहे. या औषधाचे सर्वात कमी दुष्परिणाम आहेत. ताप पूर्णपणे कमी येण्यापेक्षा आजारावर नेमके काम करणाऱ्या औषधांची यामध्ये आवश्यकता असते. पूर्णपणे ताप कमी करणेही योग्य नसते. पॅरासिटॅमॉल हे चार ते सहा तासच काम करत असल्याने बाळाचा आजार खरेच कमी होतो का नाही ते समजते, समजा पहिल्या दोन दिवसांत औषध चार वेळा द्यावे लागले. तिसऱ्या दिवशी २ ते ३ वेळा, चौथ्या दिवशी एक ते दोन वेळा औषध दिले म्हणजे बाळाचा आजार कमी होत चालला आहे. विषाणूजन्य आजार सर्वसाधारणपणे तीन ते चार दिवसांत बरे होतात.
तापाची नोंद ठेवता का?
तापाची नोंद ठेवता का? बरेचसे पालक नुसते अंग कोमट लागते, डोकं जरासे गरम लागते, असे म्हणून तापाचे औषध देतात. परंतु बाळाला खरेच ताप आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. ताप मोजून त्याची नोंद करा, ताप किती तासांनी येतो, किती वेळात उतरतो, तापावरोवर थंडी वाजून येते का, या सर्व गोष्टींची नोंद डॉक्टरांकडे जाताना जरूर घेऊन जा. यामुळे तुमचा व डॉक्टरांचा वेळ वाचेल अराणि आजाराचे निदान करणे सोपे होईल.
ताप कमी करण्यासाठी..
ताप कमी करण्यासाठी.. खुल्या हवेचा वापर शरीरावरील कपड़े जिले करून मोकळे करावेत शरीर ओल्या कपराधाने पुसून काहावेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तापाचे औषध द्यावीत.
तापाची कारणे
तापाची कारणे जिवाणू, विषाणू, जंतु प्रादुर्भाव सर्दी, खोकला, पलूसारखे श्वसनसंस्थाचे आजार लघवीतील जंतुसंसर्ग न्यूमोनिआ, मेदूज्वर, क्षय, लसीकरणानंतर एक ते दोन दिवस येणारा ताप
तापामध्ये डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा ?
तीन महिन्यांखालील बाळाला ताप असेल आणि जरी बाळ खेळत असेल तरी बाळाला गंभीर आजार असू शकतो, त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, तापात लघवीचे प्रमाण कमी होत असेल तर बाळ ग्लानीमध्ये असेल तर, सात दिवसांहून अधिक सातत्याने ताप येत असेल तर, बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, वाळाला तापाबरोबर अंगावर पुरळ चट्टे उठले असतील तर, तीन डोकेदुखी, मानदुखी झटके येत असतील, अशक्तपणामुळे चालता येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेतला पाहिजे.
ताप आल्यावर केवळ तापाला औषध देण्याव्यतिरिक्त इतर गंभीर लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मुलाला ताप आल्यानंतर घाबरून न जाता त्याच्या हालचालीवर, खेळण्यावर, खाण्यापिण्यावर, लघवीवर लक्ष ठेवावे