लाल बहादुर शास्त्री
Table of Contents
Toggleबालपण आणि शिक्षण
वाराणसीच्या मुगलसराय नामक भागात एका अत्यंत सामान्य कायस्थ कुटुंबात दि. २ ऑक्टोबर १९०४ रोजी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला. ते केवळ दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांची आई रामदुलारी, त्यांना घेऊन आपले वडील श्री. हजारीलाल यांच्याकडे आली. तिथे आपल्या आजोळी त्यांचे पालनपोषण व सहावीपर्यंतचे शिक्षण झाले.
बालवयापासून त्यांच्याकडे आत्मविश्वास व स्वावलंबन होते. स्वतःचे कपडे स्वतः धुणे, बूट पॉलिश करणे, आठ मैल चालत शाळेत जाणे, पैसे नसतील तर नदीत पोहून पलीकडे जाणे, अर्धपोटी राहणे हे सगळे कष्ट सहन करीत ते आपले शिक्षण पूर्ण करत होते. पुढच्या शिक्षणासाठी ते बनारसच्या हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये, आपल्या मावशीकडे राहण्यास आले.
८० मैल चालत प्रवास
त्या काळात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. बनारसला लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकण्यासाठी ते ८० मैल चालत येण्यास निघाले कारण भाड्यासाठी पैसे नव्हते. इ. स. १९२१ मधल्या देशातल्या असहकार चळवळीत लालबहादुरजी, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक अशा आपल्या सगळ्या अडचणी बाजूला ठेवून सामील झाले.
देशातील जमीनदारी समूळ नष्ट करण्यासाठी शास्त्रीजींनी जमीनदारी निर्मूलन करणारा एक रिपोर्ट तयार केला. तोच खूप महत्त्वाचा ठरला.
देशभक्ती आणि अभ्यास
देशभक्ती आणि अभ्यास दोन्हीही एकाच वेळी चांगल्या प्रकारे चालू ठेवण्यासाठी इ. स. १९२१ मध्ये प्राचार्य डॉ. भगवानदास यांच्या सल्ल्यावरून लालबहादुरजीनी ‘काशी विद्यापीठात’ प्रवेश घेतला. तेव्हा तिथे आचार्य नरेंद्रदेव, आचार्य कृपलानी, श्री श्रीप्रकाश, डॉ. संपूर्णानंद हे प्राध्यापक होते.
तिथे त्यांनी रामकृष्ण परमहंस, संत विवेकानंद, महात्मा, टॉलस्टॉय, लेनिन यांच्या साहित्याचा भरपूर अभ्यास केला. ‘शास्त्री’ ही पदवी मिळविली. यानंतर लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या ‘लोक-सेवक मंडळ’ या संस्थेमध्ये सभासदत्व घेऊन साठ रुपये मासिक पगारावर देशसेवेच्या कामाला सुरुवात केली.
विवाह
लालबहादूरजींच्या वयाच्या २३ व्या वर्षी इ. स. १९२७ मध्ये मिर्जापूरच्या १७ वर्षे वयाच्या ललितादेवींशी त्यांचा विवाह झाला. तै हुंडा प्रथेविरुद्ध असल्याने लग्नामध्ये त्यांनी आपल्या सासऱ्यांकडे ललितादेवींसाठी एक जोडी कडी, एक साडी, सिंदूर व स्वतःसाठी चरखा एवढेच मागितले. ललितादेवींनी स्वतःला आदर्श गृहिणी म्हणून सिद्ध केले व शेवटपर्यंत देशसेवेच्या जीवनाच्या मार्गात शास्त्रीजींना मदत केली.
स्वातंत्र्य चळवळीत सामील
लग्नानंतर लालबहादूरजी स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. इ. स. १९३० ते इ. स. १९४५ या काळात ९ वर्षे ते तुरुंगात होते. तिथे अनेक प्रकारच्या यातना शास्त्रीजींना भोगाव्या लागल्या. इ. स. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यावर प्रांतीय विधान मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले
उत्तर प्रदेशात पोलीस व परिवहन मंत्री
इ. स. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोविंद वल्लभ पंतांनी त्यांना उत्तर प्रदेशात पोलीस व परिवहन मंत्री पद दिले.

गृहमंत्री
इ. स. १९४९ मध्ये शास्त्रीजी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात गृहमंत्री झाले; पण नेहरूंनी त्यांना लगेचच राज्यसभेचे सदस्य करून नवीन मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून नेमले. इ. स. १९५७ च्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये पुन्हा जिंकून आल्यावर संचार व परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी दिली.
मग वाणिज्य व उद्योगमंत्री पद दिले. नंतर १९६१ मध्ये शास्त्रीजी गृहमंत्री झाले. त्या वेळी त्यांनी आसाममधील भाषा-समस्या व पंजाबी सुभ्याच्या निर्मितीची समस्या दोन्ही प्रश्न कुशलतेने सोडविले. इ. स. १९६२ मध्ये जेव्हा ‘कामराज योजने’च्या बाबतीत केंद्रीय मंत्र्यांना आपले पद स्वेच्छेने सोडायचे होते, तेव्हा सर्वप्रथम शास्त्रीजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
पंतप्रधान
मे १९६४ मध्ये पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर ९ जून १९६४ रोजी संसद सदस्यांनी एकमताने लालबहादूर शास्त्रींना आपला नेता निवडून भारताचे पंतप्रधान बनविले.दि. १६ मे १९६५ रोजी जेव्हा पाकिस्तानने श्रीनगर-लेह सीमेवरून भारतावर आक्रमण केले; तेव्हा शास्त्रीजींनी भारतीय सेनेला आदेश दिला.
तेव्हा १४ हजार फूट उंचीवरील या प्रदेशाला भारतीय सेनेने प्रत्युत्तर देऊन लगेच मुक्त केले. इ. स. १९६५ मध्ये देशापुढे जेव्हा दुष्काळाची समस्या उभी राहिली तेव्हा अमेरिकेच्या अपमानास्पद अटींना योग्य उत्तर देऊन देशातच समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
पकिस्तानला चोख उत्तर
इ. स. १९६५ च्या पकिस्तानच्या भारतावरील आक्रमणाला चोख उत्तर देऊन शास्त्रीजींनी स्वतंत्र भारताला पहिला विजय मिळवून दिला. आपल्या अल्प कार्यकाळामध्ये लालबहादूरजींनी जगातील राजनीतिज्ञांना स्वतःची अद्भूत कार्यक्षमता, दक्षता, राजनैतिक कौशल्य व समजदारी दाखवून दिली. शांतीचा पुजारी असलेला भारत वेळप्रसंगी माजलेल्या विक्राळ हत्तीचे गंडस्थळ फोडण्यासाठी एक क्रुद्ध सिंहही बनू शकतो, हे जगाला दाखवून दिले.
ताश्कंदला हा करार
रशियाचे प्रधानमंत्री कोसिजिन यांनी शास्त्रीजींना ताश्कंदला, पाकिस्तानबरोबर शांतता करार करण्यासाठी पाकचे राष्ट्रपती अयूब खान यांच्याबरोबर बोलाविले. तेव्हा दि. १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंदला हा करार झाला. त्यानंतर त्यांना परत भारतात यायचे होते; पण मध्यरात्री एक वाजता शास्त्रीजींना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
'भारतरत्न'
दि. २६ जानेवारी १९६६ रोजी विशेष समारंभात भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी शास्त्रीजींना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब देऊन राष्ट्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब मिळालेले श्री. लालबहादूर शास्त्री हेच पहिले भारतीय आहेत.
मृत्यू
लालबहादूर शास्त्री ११ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले .
लाल बहादुर शास्त्री भाषण मराठी
भारताचे पंतप्रधान भूषविणारे लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन एक अलौकिक जीवन होते. उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे २ ऑक्टोबर १९०४ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. एक अत्यंत सामान्य ‘कुटूबात जन्म घेऊ नही, आपल्या कठोर परिश्रमाने, प्रामाणिकपणामुळे लालबहादुर पंतप्रधानपदापर्यंत जाऊन पोहोचले. ते दीड वर्षाचे असतांना त्यांच्या पित्याचे दुःखद निधन झाले. त्यांचे पालनपोषण त्यांची माता रामदुलारीदेवीने केले. बालपणापासूनच त्यांना वेळेचे आणि परिस्थितीचे भान होते.
शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी ते काशीला गेले. तेथे शिकत असताना त्यांच्या मनातील देशप्रेम जागृत होत असे. त्याकाळी भारतात स्वातंत्र्यासाठी फार मोठया प्रमाणात आंदोलन चालले होते. परकी सत्ता उलथवून लावण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाहुती दिल्या होत्या. परदेशी कापडांची होळी, दारुबंदी व्हावी म्हणून चाललेले प्रयत्न, स्वातंत्र्य चळवळ या सर्वांचा १६-१७ वर्षाच्या लालवर फार मोठा परिणाम झाला. त्यांचे मन देशप्रेमाने भारले गेले. परंतू चांगले शिक्षण घेतल्याशिवाय देशाची सेवा करता येणार नाही, असे त्यांनी ठरविले. १९२५ मध्ये त्यांना काशी विद्यापीठाची शास्त्री ही पदवी मिळाली.
राजकीय क्षेत्रातील कार्य: लाला लजपतराय यांनी राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून लोकसेवा मंडळाची स्थापना केली होती. शास्त्रीजी त्या मंडळाचे सदस्य झाले. तिथे त्यांनी दलित, मजूर इ. साठी कार्य केले. त्यानंतर त्यांना अलाहाबादला जावे लागले. त्यांचा विवाह ललितादेवींशी झाला. परंतू राष्ट्रपेमाची भावना त्यांच्या मनात फार प्रखर होती. आपले सर्व जीवन त्यांनी देशसेवेसाठी समर्पित केले आणि वैयक्तिक सुखाला गौण स्थान दिले.
१९२०-२१ च्या सुमारास शास्त्रीजी काँग्रेसमध्ये आले. असहकार चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अनेक खेड्यामधून ते कार्य करीत. सत्याचरण, साधी राहणी आणि निःस्वार्थ सेवा वा गुणांमुळे ते प्रसिध्द झाले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते मंत्री बनले. त्यानंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, १९४८ साली गांधीवध झाला. लाल बहादूर शास्त्रीजींना पंडित नेहरूंनी काँग्रेसचे महामंत्री हे पद दिले. आपल्या जवळच्या प्रामाणिकपणा आणि कार्यकौशल्य या गुणांमुळे शास्त्रीजी राजकारणाच्या क्षेत्रात हळुहळु वरच्या पदांवर गेले. १९५६-५७ सालच्या निवडणुकीत ते विजयी झाले. २७ मे १९६४ रोजी पंडित नेहरूंचे दुःखद निधन झाले. आणि त्यानंतर ९ जून १९६४ ला शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण झाले. त्यावेळी देशातील ऐक्य राखण्यासाठी शास्त्रीजींनी आटोकाट प्रयत्न केले. १९६५ साली भारत – पाक युध्द झाले. त्यावेळी देशातील लोकांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी शास्त्रीजी अत्यंत प्रभावी भाषण करीत. १९६४ साली झालेल्या शिखर परिषदेत त्यांनी विश्वशांतीसाठी अत्यंत ओजस्वी भाषण केले. पाकिस्तान आपली लढाई थांबवायला तयार नव्हता. काश्मीरमधून पाक सैन्य घुसू लागले. तेव्हा शास्त्रीजींनी सैनिकांना पुढे चला असा आदेश दिला. त्यावेळी संपूर्ण राष्ट्र जागे झाले.
रणांगणात विजय प्राप्तीसाठी ते सैनिकांबरोबर, शेतकऱ्यांना प्रेरणा देत. म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा त्यांनी दिली. १० जानेवारी १९६६ साली लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे जनरल अयुबखान यांच्यामध्ये ताश्कंद करार झाला पण हा करार झाल्यावर ११ जानेवारी १९६६ ला सरळ, धर्मपरायण आणि निष्ठावान लालबहादूर शास्त्रींचे दुःखद निधन झाले. रशियाचे अध्यक्ष कोसिजिन यांनाही वाईट वाटले.
सरळ स्वभाव, प्रामाणिकपणा, क्षमाशीलता आणि शांतताप्रियता या गुणांमुळे आजही लोकांच्या मनात शास्त्रीजीबद्दल आदर आहे. आजच्या तरुणांनी राजकीय क्षेत्रात कार्य करतांना शास्त्रीजींचे हे गुण अंगीकारले पाहिजेत.
घोषवाक्य : जय जवान जय किसान
लाल बहादुर शास्त्री की जीवनी
भारत के प्रधान मंत्री रहे लाल बहादुर शास्त्री का जीवन एक असाधारण जीवन था। उनका जन्म 2 अक्टूबर 1904 को उत्तर प्रदेश के मुगलसराय में हुआ था। उसके पिता टीचर थे। अत्यंत साधारण परिवार में जन्मे लाल बहादुर अपनी मेहनत और ईमानदारी के दम पर प्रधानमंत्री पद तक पहुंचे। जब वह डेढ़ वर्ष के थे तब उनके पिता की दुखद मृत्यु हो गई। उनका पालन-पोषण उनकी मां रामदुलारी देवी ने किया। बचपन से ही उन्हें समय और परिस्थिति का ज्ञान था।
स्कूली शिक्षा के बाद वे आगे की शिक्षा के लिए काशी चले गये। वहां पढ़ते समय उनके हृदय में देशभक्ति जागृत हो गई। उस समय भारत में आज़ादी के लिए बहुत बड़ा आंदोलन चल रहा था। विदेशी सत्ता को उखाड़ फेंकने के लिए अनेकों ने अपने प्राणों की आहुति दी थी। विदेशी कपड़ों की होली, शराबबंदी के प्रयास, स्वतंत्रता आंदोलन इन सबका 16-17 साल के लाल पर गहरा प्रभाव पड़ा। उनका हृदय देशभक्ति से ओत-प्रोत था। लेकिन उन्होंने निर्णय लिया कि अच्छी शिक्षा प्राप्त किये बिना कोई देश की सेवा नहीं कर सकता। 1925 में उन्हें काशी विश्वविद्यालय से शास्त्री की उपाधि मिली।
राजनीतिक क्षेत्र में कार्य: लाला लाजपतराय ने राजनीतिक कार्यकर्ताओं को आर्थिक सहायता प्रदान करने के लिए लोक सेवा मंडल की स्थापना की। शास्त्रीजी उस बोर्ड के सदस्य बन गये। वहां उन्होंने दलितों, मजदूरों आदि के लिए काम किया. के लिए काम किया। इसके बाद उन्हें इलाहाबाद जाना पड़ा. उनका विवाह ललितादेवी से हुआ था। लेकिन उनके मन में देशभक्ति की भावना बहुत प्रबल थी. उन्होंने अपना पूरा जीवन देश की सेवा में समर्पित कर दिया और व्यक्तिगत खुशी को गौण स्थान दिया।
शास्त्रीजी 1920-21 के आसपास कांग्रेस में शामिल हो गये। असहयोग आन्दोलन में भाग लेने के कारण उन्हें जेल में डाल दिया गया। उन्होंने कई गांवों से काम किया. वह अपनी सत्यवादिता, सादा जीवन और निःस्वार्थ सेवा या गुणों के लिए प्रसिद्ध हुए। वे जिला कांग्रेस कमेटी के मंत्री बने। उसके बाद 1947 में भारत को आजादी मिली, 1948 में गांधी जी की हत्या कर दी गई। लाल बहादुर शास्त्री जी को पंडित नेहरू ने कांग्रेस महासचिव का पद दिया था। शास्त्रीजी अपनी ईमानदारी और कार्यकुशलता के कारण धीरे-धीरे राजनीति के क्षेत्र में ऊंचे पदों पर पहुंच गए। 1956-57 में उन्होंने चुनाव जीता। 27 मई 1964 को पंडित नेहरू की दुखद मृत्यु हो गई। और फिर 9 जून 1964 को शास्त्री जी भारत के प्रधानमंत्री बने।
1962 में चीन ने भारत पर आक्रमण किया। उस समय शास्त्री जी ने देश की एकता बनाये रखने के लिए बहुत प्रयास किये। 1965 में भारत-पाकिस्तान युद्ध छिड़ गया। उस समय शास्त्री जी ने देश की जनता का मनोबल बनाये रखने के लिए बहुत प्रभावशाली भाषण दिया। 1964 में आयोजित शिखर सम्मेलन में उन्होंने विश्व शांति के लिए बहुत ही ओजस्वी भाषण दिया। पाकिस्तान अपनी लड़ाई रोकने को तैयार नहीं था. पाक सेना कश्मीर से प्रवेश करने लगी। तब शास्त्रीजी ने सिपाहियों को आगे बढ़ने का आदेश दिया। उस समय पूरा देश जाग उठा था.
उन्होंने सैनिकों के साथ-साथ किसानों को भी युद्ध क्षेत्र में विजय प्राप्त करने के लिए प्रेरित किया। इसलिए उन्होंने जय जवान जय किसान का उद्घोष किया। 10 जनवरी, 1966 को लाल बहादुर शास्त्री और पाकिस्तान के जनरल अयूब खान ने ताशकंद समझौते पर हस्ताक्षर किए, लेकिन इस समझौते के बाद 11 जनवरी, 1966 को ईमानदार, धर्मनिष्ठ और वफादार लाल बहादुर शास्त्री की दुखद मृत्यु हो गई। रूसी राष्ट्रपति कोसिगिन भी नाराज़ थे.
लोग आज भी शास्त्री जी का उनके ईमानदार स्वभाव, ईमानदारी, क्षमाशीलता और शांति के लिए सम्मान करते हैं। आज के युवाओं को राजनीतिक क्षेत्र में काम करते हुए शास्त्रीजी के इन गुणों को अपनाना चाहिए।
नारा: जय जवान जय किसान
lal bahadur shastri speech in english
The life of Lal Bahadur Shastri, the Prime Minister of India, was an extraordinary life. He was born on 2 October 1904 in Mughalsarai, Uttar Pradesh. His father was a teacher. Born in a very ordinary family, Lal Bahadur reached the post of Prime Minister on the basis of his hard work and honesty. His father died tragically when he was one and a half years old. He was brought up by his mother Ramdulari Devi. Since childhood he had knowledge of time and situation.
After school education, he went to Kashi for further education. While studying there, patriotism awakened in his heart. At that time there was a huge movement going on for independence in India. Many sacrificed their lives to overthrow the foreign regime. Holi of foreign clothes, efforts for prohibition, freedom movement, all these had a deep impact on 16-17 year old Lal. His heart was filled with patriotism. But he decided that no one can serve the country without getting good education. In 1925 he received the title of Shastri from Kashi University.
Work in political field: Lala Lajpat Rai established Lok Seva Mandal to provide financial assistance to political workers. Shastriji became a member of that board. There he worked for Dalits, laborers etc. worked for. After this he had to go to Allahabad. He was married to Lalitadevi. But the feeling of patriotism was very strong in his mind. He dedicated his entire life to the service of the country and gave secondary importance to personal happiness.
Shastriji joined Congress around 1920-21. He was put in jail for participating in the non-cooperation movement. He worked from many villages. He became famous for his truthfulness, simple life and selfless service or qualities. He became the minister of District Congress Committee. After that India got independence in 1947, Gandhiji was assassinated in 1948. Lal Bahadur Shastri ji was given the post of Congress General Secretary by Pandit Nehru. Due to his honesty and efficiency, Shastriji gradually reached high positions in the field of politics. He won the elections in 1956-57. Pandit Nehru died tragically on 27 May 1964. And then on 9 June 1964, Shastri ji became the Prime Minister of India.
China attacked India in 1962. At that time Shastri ji made a lot of efforts to maintain the unity of the country. India-Pakistan war broke out in 1965. At that time Shastri ji gave a very impressive speech to maintain the morale of the people of the country. In the summit held in 1964, he gave a very powerful speech for world peace. Pakistan was not ready to stop its fight. Pak army started entering from Kashmir. Then Shastriji ordered the soldiers to move forward. At that time the whole country woke up.
He inspired the soldiers as well as the farmers to achieve victory in the battlefield. That’s why he announced Jai Jawan Jai Kisan. On January 10, 1966, Lal Bahadur Shastri and Pakistan’s General Ayub Khan signed the Tashkent Agreement, but after this agreement, the honest, devout and loyal Lal Bahadur Shastri died tragically on January 11, 1966. Russian President Kosygin was also angry.
Even today people respect Shastri ji for his honest nature, honesty, forgiveness and peace. Today’s youth should adopt these qualities of Shastriji while working in the political field.
Slogan: Jai Jawan Jai Kisan
लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म कधी झाला?
लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ झाला.
लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कधी झाला?
लाल बहादुर शास्त्री यांचा मृत्यू ११ जानेवारी १९६६ झाला.
लाल बहादुर शास्त्री भारतरत्न कधी मिळाला?
लाल बहादुर शास्त्री भारतरत्न १९६६ मिळाला.
लाल बहादुर शास्त्री यांचे पूर्ण नाव काय होते?
लाल बहादुर शास्त्री यांचे पूर्ण नाव लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव होते.
लाल बहादूर शास्त्री यांच्या आईचे नाव काय होते?
लाल बहादूर शास्त्री यांच्या आईचे नाव रामदुलारी होते.
लाल बहादूर शास्त्री यांनी कुठे शिक्षण घेतले?
लाल बहादूर शास्त्री यांनी बनारसच्या हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले .
लालबहादूर शास्त्री यांची घोषणा कोणती ?
लालबहादूर शास्त्री यांची घोषणा जय जवान जय किसान
lal bahadur shastri birthday
lal bahadur shastri birthday 2 October 1904
lal bahadur shastri death
lal bahadur shastri death 11 January 1966
atal bihari vajpayee birth place
He was born on 2 October 1904 in Mughalsarai, Uttar Pradesh.